Tuesday, 18 March 2025

कटुता

 विसरू सारी कटुता...


आयुष्याची उरली आता काही वर्षे 

ठरवते मनाशी विसरू सारी कटुता 

आनंदात घालवू उरलेली वर्षे 

आपल्या शरीरास नाही सोसवत आता,


परि अहंकारास म्हणते स्वाभिमान 

आठवत रहाते सारखी कटू घटना

उगाळून घेते त्याच त्याच गोष्टी,

अन वर्मी घाव बसलेल्या शब्दांना,

अजून होते मी च दुःखी कष्टी 

मग धरते मौन साऱ्यांशी 

अर्थ कळत नाही कोणा मौनाचा,

मग वाटे उदास मना!

वागणारा आजही चुकीचा वागतो

आपल्या मनाचा कोण विचार करतो?

तरी आपण परत म्हणावे का?

विसरून जावू सारी कटुता!


अर्चना कुलकर्णी

No comments:

Post a Comment