काल अर्चना मला म्हणली कि जेथे राघव तिथे सीता या विषयावर काही
लिहायचे आहे . मी हसून तिला म्हटले कि तुझे रामाबद्दल चे विचार मला माहित
आहेत , म्हणून तू राम बद्दल न लिहिता या युगातील आधुनिक सीतेबद्दल च लिही न
! त्यावर ती चटकन म्हणाली संग मग तू च नंदा बद्दल .
तर आता माझी
कथा ! नमस्कार , मी राजेश लोखंडे , शासकीय सेवेत मी उच्च लिपिक या पदावर
कार्यरत आहे .माझी पत्नी नंदा . आमचे लग्न झाले तेव्हा ती बारावी (कला )
प्रथम वर्गात उत्तीर्ण झाली होती. मी जुनी अकरावी पास . मी शासकीय सेवेत
शिपाई म्हणून काम करत होतो. लग्नानंतर थोडे च दिवसात त्या कार्यालयात
लिपिक पदाकरिता परीक्षा होती . मी ती द्यावी का न द्यावी अशा विचारात होतो
. तेव्हा नंदा म्हणाली तुम्ही ती परीक्षा द्या ,आपण दोघे मिळून अभ्यस करू
या . आन इघारातले सर्व आवरून ती माझ्या कडून अभ्यास करवून घ्यायला लागली.
घरी माझे आई -वडील सर्व तिला नावे ठेवत , कि असे काय नवर्याच्या मागे
लागते अभ्यास करा अभ्यास करा . पण तिने कधी पर्वा केली नाही . गणित मला
फार अवघड जाई , ते तिने मला शिकवले . वयाच्या २२ व्या वर्षी माझ्या कडून
पाढे पाठ करून घेतले . आमच्या प्रयत्नाला यश आले, मी लिपिक म्हणून काम करू
लागलो. तेव्हा च मला जाणवले कि नंदा खूप हुशार आहे ,आपण तिला पुढे शिक
म्हणावं , आणि तिचे B .A . करिता नाव घातले . माझ्या आई -वडिलांनी आमचे घर
सोडले , आमचे नाव सोडले , जातीत मानसिक त्रास द्यायला सुरुवात झाली . पण
नंदा व मी झुकलो नाही. मला ऑफिस मधील सहकाऱ्याची साथ होती . प्रत्येक जण
माझे विचार ऐकून कौतुक करत असे , आणि भावनिक पाठींबा म्हणजे काय ते जाणवत
असे. नंदा B .A . झाली .
त्याच दरम्यान आम्हाला मुलगी हि झाली , तिचे
थाटात बारसे केले . घरचे कोणी हि फिरकले देखील नाही. नंदाच्या आई ने सर्व
नीट पणे सांभाळले नंदा आणि सायली ला . मग नंदा ने नोकरी करिता अर्ज सुरु
केले . तिला कारकुनी कामात आवड नव्हती हे मला कळत होते , पण नियमित
पगाराकरिता तशी च नोकरी चांगली असे ती म्हणत होती .मग मी तिला सांगितले कि
तू शाळेत अर्ज कर ,तिथे नोकरी मिळाली तर दोन्ही गोष्टी साध्य होतील .
तुझी आवड आणि नियमित उत्तपन .
नंदाची परीक्षा होती तेव्हा महिनाभर मी सुट्टी घेतली , आणि घरातली सारी कामे मी करायला लागलो. तिने फक्त तिचा अभ्यास करावा .
वर्षभराने
सुश्रुत चा आगमन झाले . गार्गी आणि सुश्रुत ह्या दोघांना सांभाळून शाळेत
नोकरी करणे कठीण होते. म्हणून तिने B .ED . यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून
करायचे ठरवले . मी हि पाठींबा दिला ,जिद्दीने तिने घर - मुले सांभाळून
अभ्यास केला . शेवटचे महिनाभर शाळेत जावून शिकवणे गरजेचे होते तेव्हा
नंदाच्या आईनी मुलांची जबाबदारी घेतली . आणि आश्चर्य म्हणजे ती B .ED .
प्रथम वर्गात उत्तीर्ण झाली . मग तिला मुंबई MUNICIPAL शाळेत नोकरी
मिळाली. मुलांना पालान्घाराची सोय केली . घराचे सर्व नंदा बघत असे , मला
कधी कामाला हात लावू देत नसे . दिवस चांगले जात होते ,मग नंदा च मागे
लागली ,किती दिवस भाड्याच्या खोलीत राहायचे ? आपण एक ब्लोक्क घेवू या , मी
कर्ज घेतले आणि १ BHK ब्लोक घेतला . तिने M .A . केले .मुलांच्या
शिक्षणाकडे कटाक्षाने लक्ष दिले .
जेथे प्रीती -तेथे प्रगती
काल
विशाखाने विषय दिला ,जेथे राघव तिथे सीता ! ह्या विषयावर काय लिहायचे ,
मग आठवले राजेश बद्दल .... आणि आता राजेश सांगेल त्याची कथा .
तर आता
माझी कथा ! नमस्कार , मी राजेश लोखंडे , शासकीय सेवेत मी उच्च लिपिक या
पदावर कार्यरत आहे .माझी पत्नी नंदा . आमचे लग्न झाले तेव्हा ती बारावी
(कला ) प्रथम वर्गात उत्तीर्ण झाली होती. मी जुनी अकरावी पास . मी
शासकीय सेवेत शिपाई म्हणून काम करत होतो. लग्नानंतर थोडे च दिवसात त्या
कार्यालयात लिपिक पदाकरिता परीक्षा होती . मी ती द्यावी का न द्यावी अशा
विचारात होतो . तेव्हा नंदा म्हणाली तुम्ही ती परीक्षा द्या ,आपण दोघे
मिळून अभ्यस करू या .आणि घरातले सर्व आवरून ती माझ्या कडून अभ्यास करवून
घ्यायला लागली. घरी माझे आई -वडील सर्व तिला नावे ठेवत , कि असे काय
नवर्याच्या मागे लागते अभ्यास करा अभ्यास करा . पण तिने कधी पर्वा केली
नाही . गणित मला फार अवघड जाई , ते तिने मला शिकवले . वयाच्या २२ व्या
वर्षी माझ्या कडून पाढे पाठ करून घेतले . आमच्या प्रयत्नाला यश आले, मी
लिपिक म्हणून काम करू लागलो. तेव्हा च मला जाणवले कि नंदा खूप हुशार आहे
,आपण तिला पुढे शिक म्हणावं , आणि तिचे B .A . करिता नाव घातले . माझ्या
आई -वडिलांनी आमचे घर सोडले , आमचे नाव सोडले , जातीत मानसिक त्रास
द्यायला सुरुवात झाली . पण नंदा व मी झुकलो नाही. मला ऑफिस मधील
सहकाऱ्याची साथ होती . प्रत्येक जण माझे विचार ऐकून कौतुक करत असे , आणि
भावनिक पाठींबा म्हणजे काय ते जाणवत असे.
नंदाची परीक्षा होती
तेव्हा महिनाभर मी सुट्टी घेतली , आणि घरातली सारी कामे मी करायला लागलो.
तिने फक्त तिचा अभ्यास करावा .नंदा B .A . झाली .
त्याच
दरम्यान आम्हाला मुलगी हि झाली , तिचे थाटात बारसे केले . घरचे कोणी हि
फिरकले देखील नाही . मग नंदा ने नोकरी करिता अर्ज सुरु केले . तिला
कारकुनी कामात आवड नव्हती हे मला कळत होते , पण नियमित पगाराकरिता तशी च
नोकरी चांगली असे ती म्हणत होती .मग मी तिला सांगितले कि तू शाळेत अर्ज
कर ,तिथे नोकरी मिळाली तर दोन्ही गोष्टी साध्य होतील . तुझी आवड आणि
नियमित उत्पन्न .वर्षभराने सुश्रुत चा आगमन झाले . सायली आणि सुश्रुत
ह्या दोघांना सांभाळून शाळेत नोकरी करणे कठीण होते. म्हणून तिने B .ED .
यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून करायचे ठरवले . मी हि पाठींबा दिला
,जिद्दीने तिने घर - मुले सांभाळून अभ्यास केला . शेवटचे महिनाभर शाळेत
जावून शिकवणे गरजेचे होते तेव्हा नंदाच्या आईनी मुलांची जबाबदारी घेतली .
आणि आश्चर्य म्हणजे ती B .ED . प्रथम वर्गात उत्तीर्ण झाली . मग तिला
मुंबई MUNICIPAL शाळेत नोकरी मिळाली. मुलांना पाळणा घराची सोय केली .
घराचे सर्व नंदा बघत असे , मला कधी कामाला हात लावू देत नसे . दिवस
चांगले जात होते ,मग नंदा च मागे लागली ,किती दिवस भाड्याच्या खोलीत
राहायचे ? आपण एक ब्लोक्क घेवू या , मी कर्ज घेतले आणि १ BHK ब्लोक
घेतला . तिने M .A . केले .मुलांच्या शिक्षणाकडे कटाक्षाने लक्ष दिले .आज
मुलगी शिकून रुईया महाविद्यालयात प्रोफेसर आहे. मुलगा इंजिनीरिंग करत आहे
.नंदा मुख्याध्यापक झाली आहे. माझे आई- वडील परत आले. त्यांचे हि ती मन
लावून करते . शिक्षणाने प्रगती होते हे त्यांना हि आता पटले आहे.
....
भले राजेश कोणी मोठा सत्कारा इतका नसेल पण सामान्य जीवन जगताना देखील
यशस्वी सहजीवन कसे असावे हे ह्यामधून दिसून येते , म्हणून मी म्हणेन कि
जेथे राघव तिथे सीता न म्हणता ....
.नकोत नुसती नाती ,
मोडून काढू भिंती ,
रुजावी तिथे प्रीती ,
मग होते प्रगती .
अर्चना कुलकर्णी ..ठाणे-- March 2012