Saturday, 28 April 2012

बालपण

आज हि आठवते आहे
ते निरागस बालपण !
बालवाडीत खाल्लेला
केक चा सांडलेला कण !
ते अल्लड बालपण अन
शाळेत साजरे केले मराठी सण !
ते खट्याळ क्षण जेव्हा
दुसर्याच्या डब्यातील
पाहून खाऊ छान
सुटायचे आपले भान !

अर्चना ....१९/१२/२०११

मैत्री

मैत्री म्हणजे नेमके काय ? प्रत्येकाचे मत वेगळे असेल , माझ्या मते आधी ओळख ,मग विश्वास .... आपल्या चांगल्या -वाईट प्रसंगाला समजून घेईल असा , स्वतः चे आनंद-दुख आपल्याला सांगेल असा ..... असा विश्वास असला कि मैत्री झाली ...मग नेहमी हाय ,हेल्लो म्हणायची पण गरज लागत नाही .मित्र/मैत्रीण फार काळ आपल्याशी बोलले नाहीत म्हणजे मैत्री संपते का ? तर तसे नंसते खर्या मैत्रीत समजुतदारपणा असतो , जर कधी एकाचे चुकले ...तर दुसर्याने समजून सांगण्याचा अधिकार असतो ,आणि दुसर्याने ते समजून घेण्याचा भाग असतो ...इथे माफी किंवा धन्यवाद अशा वरवरच्या शब्दांना थारा नसतो...मैत्रीमध्ये वैचारिक मतभेद असू शकतात ,पण ते इतर ठिकाणी गोस्सीप चे विषय म्हणून बोलले जावू नये हि सामान्य अपेक्षा असते.. मैत्री करताना मी विचारपूर्वक करत नाही , पण मैत्री तोडताना कोणी हि गैरसमजातून तुटू नये हि अपेक्षा आहे... आपल्याला काय वाटते ? 
 अर्चना २०/२/२०१२


 

स्त्री अस्मिता

नारी ही सृष्टीची माता !
असे हि प्रेमळ सरिता
तिजठायी अखंड सहनशीलता
अन कार्यकुशलता
कधी बने ती रंजिता
तर कधी परिणीता
जपे सदा स्व अस्मिता
भाव मनी तो सदैव समर्पिता !


 अर्चना - ७/३/२०१२

रुजावी तिथे प्रीती , मग होते प्रगती

 काल अर्चना मला म्हणली कि जेथे राघव तिथे सीता  या विषयावर काही लिहायचे आहे . मी हसून तिला म्हटले कि तुझे रामाबद्दल चे विचार मला माहित आहेत , म्हणून तू राम बद्दल न लिहिता या युगातील आधुनिक सीतेबद्दल च लिही न ! त्यावर ती चटकन म्हणाली संग मग तू च नंदा बद्दल .
तर आता माझी कथा !  नमस्कार , मी राजेश लोखंडे , शासकीय सेवेत मी उच्च लिपिक या पदावर कार्यरत  आहे .माझी पत्नी नंदा . आमचे लग्न झाले तेव्हा ती बारावी (कला ) प्रथम वर्गात उत्तीर्ण झाली होती. मी जुनी अकरावी पास . मी शासकीय सेवेत शिपाई म्हणून काम करत होतो. लग्नानंतर थोडे च दिवसात त्या कार्यालयात लिपिक पदाकरिता परीक्षा होती . मी ती द्यावी का न द्यावी अशा विचारात होतो . तेव्हा नंदा म्हणाली तुम्ही ती परीक्षा द्या ,आपण दोघे मिळून अभ्यस करू या . आन इघारातले सर्व आवरून ती माझ्या कडून अभ्यास करवून घ्यायला लागली. घरी माझे आई -वडील सर्व तिला नावे ठेवत , कि असे काय नवर्याच्या मागे लागते अभ्यास करा अभ्यास करा . पण तिने कधी पर्वा केली नाही . गणित मला फार अवघड जाई , ते तिने मला शिकवले . वयाच्या २२ व्या वर्षी माझ्या कडून पाढे पाठ करून घेतले . आमच्या प्रयत्नाला यश आले, मी लिपिक म्हणून काम करू लागलो. तेव्हा च मला जाणवले कि नंदा खूप हुशार आहे ,आपण तिला पुढे शिक म्हणावं , आणि तिचे B .A . करिता नाव घातले . माझ्या आई -वडिलांनी आमचे घर सोडले , आमचे नाव सोडले , जातीत मानसिक  त्रास द्यायला सुरुवात झाली . पण नंदा व मी झुकलो नाही. मला ऑफिस मधील सहकाऱ्याची साथ होती . प्रत्येक जण माझे विचार ऐकून कौतुक करत असे , आणि भावनिक पाठींबा म्हणजे काय ते जाणवत असे. नंदा B .A . झाली .
त्याच दरम्यान आम्हाला मुलगी हि झाली , तिचे थाटात बारसे केले . घरचे कोणी हि फिरकले देखील नाही. नंदाच्या आई ने सर्व नीट पणे सांभाळले नंदा आणि सायली ला . मग नंदा ने नोकरी करिता अर्ज सुरु केले . तिला कारकुनी कामात आवड नव्हती हे मला कळत होते , पण नियमित पगाराकरिता तशी च नोकरी चांगली असे ती म्हणत होती .मग मी तिला सांगितले कि तू शाळेत अर्ज कर ,तिथे नोकरी मिळाली तर दोन्ही गोष्टी साध्य होतील . तुझी आवड आणि नियमित उत्तपन .
नंदाची परीक्षा होती तेव्हा महिनाभर मी सुट्टी घेतली , आणि घरातली सारी कामे मी करायला लागलो. तिने फक्त तिचा अभ्यास करावा .
वर्षभराने सुश्रुत चा आगमन झाले . गार्गी आणि सुश्रुत ह्या दोघांना सांभाळून शाळेत नोकरी करणे कठीण होते. म्हणून तिने B .ED . यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून करायचे ठरवले . मी हि पाठींबा दिला ,जिद्दीने तिने घर - मुले सांभाळून अभ्यास केला . शेवटचे महिनाभर शाळेत जावून शिकवणे गरजेचे होते तेव्हा नंदाच्या आईनी मुलांची जबाबदारी घेतली . आणि आश्चर्य म्हणजे ती B .ED . प्रथम वर्गात उत्तीर्ण झाली . मग तिला मुंबई MUNICIPAL  शाळेत नोकरी मिळाली. मुलांना पालान्घाराची सोय केली . घराचे सर्व नंदा बघत असे , मला कधी कामाला हात लावू देत नसे . दिवस चांगले जात होते ,मग नंदा च मागे लागली ,किती दिवस भाड्याच्या खोलीत राहायचे ? आपण एक ब्लोक्क घेवू  या , मी कर्ज घेतले आणि १ BHK  ब्लोक घेतला . तिने M .A . केले .मुलांच्या शिक्षणाकडे कटाक्षाने लक्ष दिले .

जेथे प्रीती -तेथे  प्रगती

काल विशाखाने विषय दिला ,जेथे राघव तिथे सीता ! ह्या विषयावर काय लिहायचे , मग आठवले राजेश बद्दल .... आणि आता राजेश सांगेल त्याची कथा .
तर आता माझी कथा !  नमस्कार , मी राजेश लोखंडे , शासकीय सेवेत मी उच्च लिपिक या पदावर कार्यरत  आहे .माझी पत्नी नंदा . आमचे लग्न झाले तेव्हा ती बारावी (कला ) प्रथम वर्गात उत्तीर्ण झाली होती. मी जुनी अकरावी पास . मी शासकीय सेवेत शिपाई म्हणून काम करत होतो. लग्नानंतर थोडे च दिवसात त्या कार्यालयात लिपिक पदाकरिता परीक्षा होती . मी ती द्यावी का न द्यावी अशा विचारात होतो . तेव्हा नंदा म्हणाली तुम्ही ती परीक्षा द्या ,आपण दोघे मिळून अभ्यस करू या .आणि  घरातले  सर्व आवरून ती माझ्या कडून अभ्यास करवून घ्यायला लागली. घरी माझे आई -वडील सर्व तिला नावे ठेवत , कि असे काय नवर्याच्या मागे लागते अभ्यास करा अभ्यास करा . पण तिने कधी पर्वा केली नाही . गणित मला फार अवघड जाई , ते तिने मला शिकवले . वयाच्या २२ व्या वर्षी माझ्या कडून पाढे पाठ करून घेतले . आमच्या प्रयत्नाला यश आले, मी लिपिक म्हणून काम करू लागलो. तेव्हा च मला जाणवले कि नंदा खूप हुशार आहे ,आपण तिला पुढे शिक म्हणावं , आणि तिचे B .A . करिता नाव घातले . माझ्या आई -वडिलांनी आमचे घर सोडले , आमचे नाव सोडले , जातीत मानसिक  त्रास द्यायला सुरुवात झाली . पण नंदा व मी झुकलो नाही. मला ऑफिस मधील सहकाऱ्याची साथ होती . प्रत्येक जण माझे विचार ऐकून कौतुक करत असे , आणि भावनिक पाठींबा म्हणजे काय ते जाणवत असे.
नंदाची परीक्षा होती तेव्हा महिनाभर मी सुट्टी घेतली , आणि घरातली सारी कामे मी करायला लागलो. तिने फक्त तिचा अभ्यास करावा .नंदा B .A . झाली .

त्याच दरम्यान आम्हाला मुलगी हि झाली , तिचे थाटात बारसे केले . घरचे कोणी हि फिरकले देखील नाही . मग नंदा ने नोकरी करिता अर्ज सुरु केले . तिला कारकुनी कामात आवड नव्हती हे मला कळत होते , पण नियमित पगाराकरिता तशी च नोकरी चांगली असे ती म्हणत होती .मग मी तिला सांगितले कि तू शाळेत अर्ज कर ,तिथे नोकरी मिळाली तर दोन्ही गोष्टी साध्य होतील . तुझी आवड आणि नियमित उत्पन्न .वर्षभराने सुश्रुत चा आगमन झाले . सायली  आणि सुश्रुत ह्या दोघांना सांभाळून शाळेत नोकरी करणे कठीण होते. म्हणून तिने B .ED . यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून करायचे ठरवले . मी हि पाठींबा दिला ,जिद्दीने तिने घर - मुले सांभाळून अभ्यास केला . शेवटचे महिनाभर शाळेत जावून शिकवणे गरजेचे होते तेव्हा नंदाच्या आईनी मुलांची जबाबदारी घेतली . आणि आश्चर्य म्हणजे ती B .ED . प्रथम वर्गात उत्तीर्ण झाली . मग तिला मुंबई MUNICIPAL  शाळेत नोकरी मिळाली. मुलांना पाळणा घराची  सोय केली . घराचे सर्व नंदा बघत असे , मला कधी कामाला हात लावू देत नसे . दिवस चांगले जात होते ,मग नंदा च मागे लागली ,किती दिवस भाड्याच्या खोलीत राहायचे ? आपण एक ब्लोक्क घेवू  या , मी कर्ज घेतले आणि १ BHK  ब्लोक घेतला . तिने M .A . केले .मुलांच्या शिक्षणाकडे कटाक्षाने लक्ष दिले .आज मुलगी शिकून रुईया महाविद्यालयात प्रोफेसर आहे. मुलगा इंजिनीरिंग करत आहे .नंदा मुख्याध्यापक झाली आहे.  माझे आई- वडील  परत आले. त्यांचे हि ती मन लावून करते . शिक्षणाने प्रगती होते हे त्यांना हि आता पटले आहे.
.... भले राजेश कोणी मोठा सत्कारा इतका नसेल पण सामान्य जीवन जगताना देखील यशस्वी सहजीवन कसे असावे हे ह्यामधून दिसून येते , म्हणून मी म्हणेन कि जेथे राघव तिथे सीता न म्हणता ....
.नकोत नुसती नाती ,
मोडून काढू भिंती ,
  रुजावी तिथे प्रीती ,

 मग होते प्रगती .

अर्चना कुलकर्णी ..ठाणे-- March 2012

मन



मनास  पडले मनाचेच  कोडे
न माहित कधी ते उलगडे ?
कधी ते स्वप्नात बागडे
वेचीते  कधी सत्याचे तुकडे !

आठवे कधी बोलणे रांगडे

बोले कधी बोल चिमखडे !

कधी जाणवता  उन उघडे

पांघरी ते विश्वासाचे कातडे

मनास पडले मनाचेच कोडे !


Archana - 14//02/2012 




रितेपणा

प्रौढ वयाची ती ललना
पांघरी चेहऱ्यावर बालिशपणा
करत असे सर्वांशी लडिवाळपणा
लपवण्या आपला एकटेपणा
कोणी म्हणतसे चवचालपणा
कोणा  मनी दाटे करूणा
कुणी दाखवी आपलेपणा
तरी ना भरे तिचा रितेपणा !


अर्चना ...

Sunday, 15 April 2012

मैत्री

मैत्री असावी मैत्रीसारखी नकोत नुसती नाती
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच काही भीती
तिथे सूर जुळता उमटतील आपोआप गाणी
गाण्यातून अर्थ कळावा,मौनातून गाणी
पैश्याचा तिथे उच्चार नसावा ,नसावा कसला मान
लहान मोठे असे नसावे सर्व आहोत समान
आहोत आपण मैत्रिणी याचे ठेवू या भान
गप्पा मारताना मात्र नसावे वेळेचे भान !

(मूळ कविता घर असावे घरासारखे यावरून सुचलेली )
Archana Kulkarni.

घर आहे तेच असते

घर आहे तेच असते ,
शिशुपणी आपल्या स्मित हास्यात डोलू लागते !
बालपणी उभे राहण्याकरिता आधार देवू लागते
तरुणपणी आपल्या सुखात ते हि हसू लागते
प्रौढपणी आपली काळजी घेवू लागते
वार्धक्याकडे झुकताच आपल्याला टाळू लागते
अन नंतर नंतर आपल्या प्रस्थानाची वाट बघू लागते
घर आहे तेच असते ,फक्त भाषा बदलत राहते !

अर्चना

चिमणी

 एकटीच चिमणी करत होती चिव चिव
कळले न कोणा त्यातले अर्थपूर्ण मन
भयाण आणि भकास झाले सारे रान
कशाकरिता करायची ही सारी वणवण
सहन होत नाही तिला ही ताण
ज्याची कोणालाच नाही  जाण !
  • अर्चना ....

Thursday, 12 April 2012

स्पर्धा ....

आमच्या वसाहतीत काल संध्याकाळ चा सुदृढ बालक स्पर्धा (वयोगट १ ते ३ वर्षे ) आयोजित केली होती . मी नेहमीप्रमाणे भाजी घ्यायला खाली उतरले तर सगळी छोटी मुले आई सोबत उभी ....त्यांची तेव्हा धावण्याची स्पर्धा सुरु होत होती .. ८-१० बालके धावण्याकरिता उभी त्यांच्या मागे आई (आया ) असे धाव, तिकडे  पोच ,पहिला तू च आला पाहिजेस ... आता मुलांचे वय दीड ते अडीच असावे पण प्रत्येक आई हेच सांगत  होती ,बाळांना किती समजत होते माहित नाही .
शिट्टी वाजली मग आई तर काय एकदम ओरडायला च सुरुवात अरे राजू धाव अग राणी नीट पळ, आणि बाजूने त्याही धावू लागल्या .....


एका बाजूने बाबा ज कॅमेरे घेवून धावत आहेत ......
आहा आणि  आमचा बाळू बसला कि धपकन खालीच ... मग आई चा वैताग... अरे पळ न! .... नाही........ मी नाही ....आणि भोकाड सुरु!
...राणी ने सुरुवात तर चांगली केली ,पण बाजू ने आई पण धावते पाहिल्यावर आली  धावत आई कडे  , आता झाली न पंचाईत !
सगळे पळत आहेत हे पाहून सनी ने केली सुरुवात दुडूदुडू रांगायला च .....
तिथे राजू ,मनी ,सोनी,पिंकी  धावत होते , आणि एकदाचा  राजू पोचला पहिल्या नंबर वर ..... आणि गप्पकन आई च्या हातातील केक खाल्ला...... मग सगळ्यांना समजले कि राजू इतके भरभर कसा धावला? त्याचे बाबा एका बाजूला उभे होते आणि आई दुसर्या बाजूला हातात केक घेवून उभी !


झाले चिडलीच कि मग पिंकीची  आई ...तुम्ही चीटिंग  केलीत मिसेस .......... ! असे नाही करायचे ....दोघींचे जुंपले ...
माझ्या मागून बाळू चे आई -बाबा येत होते.... बाळू ची आई बाबांवर चिडली होती ..आहे न अगदी तुमच्यासारखा ...जरा जागचा हलला नाही...गेले न बक्षीस ?
राणीच्या आई ने तर राणीच्या पाठीत च धपाटाच  घातला .... एरवी मी हाक मारते तर तू पी.टी.उषापेक्षा जास्ती जोराने दुसरीकडे पळतेस आणि आज काय झाले ?


आमच्या घरचे त्यात कोणी नव्हते म्हणून मी थांबले नाही ...


पण माझ्या मनात काही प्रश्न आले ,तुम्हाला पण काय वाटते ते सांगा ..१. सुदृढ बालक स्पर्धेत पळण्याची शर्यत का आली ?


२. सुदृढ बालक ठीक आहे पण पालकांची मने सुदृढ आहेत का ?


३. आयुष्यातल्या पहिल्या -वहिल्या स्पर्धेत हरल्यानंतर आई च्या हात चा धपाटा खाल्लेली राणी स्पर्धा हि स्पर्धा असते त्यात हार-जीत आहे च असा विकॅह्र करू शकेल  का ?


४. ह्या स्पर्धेत मुलाचा नंबर आला नाही म्हणून पालकांनी (विशेष तः आई ने ) आपला पराजय असे मानणे योग्य आहे का ?




मुलांना मुल म्हणून जगू न देणे अगदी दीड वर्षापसून  योग्य आहे का ?.......


महिला दिन

आला महिला दिन आला
स्त्रियांचा सत्कार केला
अबला नसे हि सबला
असा केला गलबला
परत त्याच गप्पा झडल्या
स्त्रीभ्रूण हत्या विषय चघळला
कित्येक गर्भारशी विझून गेल्या
हुंडा बळी किती गेल्या ?
कित्येक गेल्या उगाच छेडल्या
दुख त्यांचे त्याच गिळल्या
विसरून सारे दिला
नवचैतन्याचा नारा !



ती आणि तो

तिच्या त्याच्या आवडी कधी च जुळत नाहीत
हातात हात घालून फिरायला त्याला आवडत नाही
रस्त्याने चालताना भरभर चालणे तिला जमत नाही
हॉटेलातले पंजाबी जेवण त्याला आवडत नाही
अन तिथे जावून भाजी-भाकरी खाणे  तिला रुचत नाही
मित्र मैत्रीणीना गोळा करणे त्याच्या स्वभावातच नाही
मित्र मैत्रीणीना न भेटता तिला राहवत नाही
नाटक पाहताना मागची सीट त्याला चालत नाही
नाटक पाहताना सीटवरून कटकट तिला टाळता येत नाही
 तिला स्वच्छता साफसफाई केल्याशिवाय राहवत नाही
घरभर पसारा केल्याखेरीज त्याला चैन पडत नाही
खरेदीला निघाल्यावर दहा दुकाने फिरणे त्याला खपत नाही
एकाच दुकानातून  ते ही पटपट खरेदी तिला जमत नाही
तिची होणारी घुसमट त्याला कळत नाही
त्याचे होणारे हाल- दगदग  तिला समजत नाही
असे वेगवेगळे स्वभाव बनवाल्याखेरीज निर्मात्याला चैन पडत नाही
आणि विरुद्ध स्वभाव एकत्र आणल्याशिवाय त्याला  मजा वाटत नाही
तरी संसार हा दोघांचा आहे तो निभावल्या शिवाय ते रहात नाहीत
आणि सुखी संसाराचे चित्र दाखवायला विसरत नाहीत .....!
अर्चना ....