Friday, 28 September 2012

मन

मन आठवांचे माहेर
नाही उगी क्षणभर !
कधी मनी
आशेचा महासागर
आणि  कधी नयनी
लोटे अश्रूचा महापूर !
कळे ना मज
का होई सैरभैर  ?

अर्चना

29--09-2012

Tuesday, 25 September 2012

विरक्ती !

असे अचानक कधी तरी
रिक्त होतात मनाच्या खोल्या,
नि बंद  पडून राहतात कवाडे  ,
नको तो सूर्याचा प्रकाश
हवा वाटे जीवघेणा अंधार
पाउल नको टाकू  बाहेर,
की डोकवू नको  कुठे,

वाटे  पडून रहाव निपचित
आपल्याच  मनाच्या भावना निरखत !
नको कोणाच्या शब्द्खुणा
नको गर्दीच्या पाऊलखुणा

नको कसली हि आसक्ती
अशी च पोसावी विरक्ती !

अर्चना कुलकर्णी ,ठाणे

Friday, 14 September 2012

शब्द ---


शब्द ---

काही कठोर ,तर काही मृदू
काही खट्याळ ,तर काही प्रेमळ
कधी द्वअर्थी ,तर कधी निर्मळ
काही व्यक्त होतात
तर काही अव्यक्त च राहतात
कधी हृदयाला भिडतात
तर कधी हृदयाला घर पाडतात
कधी विषासारखे कडू
तर कधी मधासारखे गोड
चेहऱ्यावर जरी हास्य आणले
तरी मनात हे शब्द दाटले
बोलणार्याने बोललेले
ऐकणार्याने समजलेले
एकमेकात गुंतलेले 
नाते अंतरी ते जोडलेले !

अर्चना ....24/09/2012

Thursday, 13 September 2012

कोळी

कोणत्याही नात्यामध्ये गुंतायच नसतं,,
नात्याला आपण गुंफायच असतं..!!
होवून कोळी जाळ आपणच विणायचं असतं,,
कोळ्या सारखच  मात्र मुक्त फिरायचं असतं..!
असं कधीतरी वाचलं होतं
पण खरच का कोळी मुक्त राहू शकतो ?
जाळे विणता विणता तेच घर म्हणू लागतो !
अन मग अवचित तुटता ,तो हि रडत असतो !

अर्चना ...

Monday, 10 September 2012

मिलन

दिवस आहे बेभान पावसाचा
लाटा घेतसे  आसरा किनार्याचा
दिस जरी नाही आज पुनवेचा
तरी आहे आपल्या मिलनाचा !
अर्चना ....