Friday, 28 September 2012

मन

मन आठवांचे माहेर
नाही उगी क्षणभर !
कधी मनी
आशेचा महासागर
आणि  कधी नयनी
लोटे अश्रूचा महापूर !
कळे ना मज
का होई सैरभैर  ?

अर्चना

29--09-2012

No comments:

Post a Comment