Sunday, 27 May 2012

घाव

जवळचे च कोणी जेव्हा निखार्यागत वागतात
 अश्रू देखील तेव्हा न ओघळणे पसंद करतात
अन हुंदके हि मूक होवून जातात
मनातले घाव मनातच राहतात !

अर्चना

Sunday, 20 May 2012

माता दिन

माता दिन म्हणुनी
लेकाचा फोन आला
विसरुनी मागचे सारे
आईला पाझर फुटला !
ऐकोनी शुभेच्छा सार्या
माता म्हणे त्याजला
तुला पाहोनी
बराच काळ लोटला !
शिकुनी घे तू
कॉम्पुटर चा मेळ सगळा
मग SKYPE  वरुनी
दाखवेन दुनिया सारी तुजला !
अरे पण एकदा
येवूनी जा बाळा
तव स्पर्शाकरिता
जीव हा आसुसला !
कामाचा हा सारा पसारा
त्यात नसे सुट्टीला थारा !
तिकीट धाडतोस का मजला ?
येवूनी भेटेन मी तुला !
पहातो मिळेल का विसा तुला
अन त्याने फोन ठेवला !
मग लेकीचा फोन वाजला
आई तुझ्या वर मी केली कविता
ऐक आधी ती आता
जागी सर्व श्रेष्ठ माझी माता
तिच्यावाचुनी जीवनात रिक्तता !
मातेस वाटे बहु धन्यता
कधी येतेस तू भेटायला ?
आता नको
खूप असेल न गावी उन्हाळा ?
मग मी येवू का मुंबईला ?
अग पाणी नाही नळाला
अन नणंद हि
येत असे  माहेरपणाला
भेटू आपण दिवाळीला !
आवरोनी भावनेचा उमाळा
हास्य आणोनी डोळा
म्हणतसे सुखी रहा तू बाळा !

अर्चना ....

Sunday, 13 May 2012

आई

बाळ जन्माला येताच स्वतःचे अस्तित्व विसरणारी ती असते आई
केवळ मुलांकरिता सतत झटणारी ती असते आई
बालपणी आपण न बोलताच समजणारी ती असते आई
लहानपणी आपल्यामागे सावलीसारखी धावणारी ती असते आई
मित्र परिवारात जरी तिला विसरतो तरी ती असते आई
जीवनात कुठल्याही अडचणीत प्रथम जिची आठवण येते ती असते आई
जिच्या मांडीवर डोके ठेवल्यावर सर्व चिंता विसरायला लावते ती असते आई
स्वतः करिता काहीही न मागता देवाकडे फक्त मुलांकरिता मागते ती असते आई !
जिच्या मायेपेक्षा ,त्यागापेक्षा जगात काहीही श्रेष्ठ नाही अशी असते ती आई !....

अर्चना

नाती

जोडलेली  नाती निभावताना,
प्रश्न नसावा अभिमानाचा
नात्यातील विश्वास महत्वाचा…
तो विश्वास जपताना
हवे प्रेम अन आपुलकी .
करू नयेत कधी हेवे दावे
जावे विसरुन दोष अन्‌ रुसवे फ़ुगवे!
नात्याचे मग झाड बहरते
कधी त्यास मग पानगळ हि न छळते !
अर्चना




Thursday, 3 May 2012

मन

मनाला घालू नकोस फार आवर
फिरू दे त्याला हि चौफेर
 वाटेल कधी कोणाची ओढ अनावर
 मग  पळत सुटेल ते चौखूर !
ठेव विश्वास तुझ्या नजरेवर
होणार नाही मन कधी सैरभैर !

अर्चना ...



asech

चांगले मित्र म्हणता म्हणता
कधी पाठीत खंजीर खुपसतात
ते कळत नाही !
प्रत्येकाच्या आयुष्यात
"यु टू ब्रुटस " असे म्हणायचा
क्षण आल्याशिवाय रहात नाही !....
अर्चना

Wednesday, 2 May 2012

सांज वात

 सांज वात लावता
घर माझे उजळे
आनंदे कर जुळता
भय सारे दूर पळे !!
अर्चना कुलकर्णी

श्रीकृष्ण

श्रीकृष्ण बासरी वाजवतो
गोकुळ सारे गाजवतो !
बासरीचा सूर तो ऐकता
वासरे थांबती पाणी पिता!
थबके गोपी नृत्य करिता
जीवा शिवाची होई एकता ! 

जीवा-शिवाची ही भेट झाली
तगमग ती सर्व संपली
जन्म मृत्यू ची फेरी चुकली
मनी बिंबली एकच मुरली !
वृन्दावनीची निरव शांती
किती फिरावे ,परी न तृप्ती
आनंदाचे क्षण रेंगाळती
अजून हि त्या आनंद प्रांती !

8.12.2010

पाऊस

पावसाच्या प्रत्येक सरीमध्ये
मला तुझी छबी दिसते
अन पावसात भिजण्याची
मनी उर्मी दाटते ....




पाऊस जरी थांबलेला
श्वास माझा रोखलेला
पापण्या तुझ्या मिटलेल्या
अन स्पर्श तुझा भासातला
आज मात्र हळुवारलेला !









आठवणी पावसाच्या
कधी ना सरायच्या
मनमुराद भिजायच्या
मन प्रसन्न करायच्या


अर्चना ...2/5/2012

Tuesday, 1 May 2012

प्रिय सखीस ,

 अग, तुझं माझं नात
धरणी पावसागत !
वाट पहाते धरणी पावसाची
मी वाट पहाते तुझ्या बोलण्याची
धरणी शोधे पावसाला
काळ्या काळ्या ढगात
मी शोधते तुला fb  च्या जंगलात
बोलून शब्द चार
तू झालीस पसार
मी मात्र अजून
 करते आहे तुझा च विचार

बाबा

आई चे प्रेम बालपणी च उमजते ,
वडिलांची माया कळायला थोडे मोठे व्हावे लागत,

बाबांची आवड आपल्याला कधी कळत च नाही
आपल्या गरजा पुरवताना ते हि विसरून जातात
आता विचारावे  वाटते माझ्या करिता तुम्ही किती आवडी सोडल्या ?
माझ्या हौशेखातर कधी नाही म्हटले नाही सहलीला
स्वतः मात्र जात राहिले बस ने ऑफिस ला

चांगले हवे घर राहायला म्हणून घेतला flat  छान
हफ्ते फेडताना मात्र निघाला तुमचा घाम
जाणवले नाही कधी तेव्हा ,
जाणवते ते आज जेव्हा
श्वास घ्यायला सुद्धा दिवस नाही पुरा
कधी भेटाव म्हटले तर
आज नाही जमत ,उद्या नाही जमत

फोन वर बोलून तुम्ही समाधान मानायचे
माझे मात्र मन मला खात राहायचं ...!
बाबा आज चा दिवस मात्र आहे खास तुमचा !
 तुमच्या जुन्या आठवणी चा !

15/6/2011

संसार

अचानक जमल्या मैत्रिणी चार
सर्वांनी मांडले आपले विचार
त्यातून निघाले एक च सार
असा असतो हा संसार
स्त्री चरित्रावर विखार
पुरुषास मात्र मोकळे दार
पुरुष करे व्यभिचार
तरी सारे घेती कैवार
स्त्रीस मात्र बोलण्याचा हि न अधिकार
तिज असे मूक हुंदक्यांचा आधार
चूक नसताना हि स्त्री ने घ्यावी माघार
 तर च  चालतो दोघांचा संसार !!

3/7/2011

मैत्री -सख्यांशी

या सख्यानो या करिता माझ्या मनातले काही ,
जन्मले तेव्हाच , नात्याचे जाळे तयार होते ,
तरीहि जगताना , खऱ्या मैत्रीच्या शोधात होते ,

मैत्री" , शब्द उच्चारताच, आपलेपणाची जाणीव होते,
मनही मग दुख, पेलला हसत-हसत तयार होते,

गरज नसते दाखल्याची , जेथे असतो फक्त विश्वास ,
मैत्रीच्या या नात्याची , बात च असते काही खास ,

इतर नात्यापेक्षा, हे नाते काहीतरी वेगळे असते,
न बोलता मनातील वेदना एकमेकांना कळत असते ,
नेहमी चांगल्या विचारांची , जाणीव मैत्री करून देते ,
आपल्या अबोल्याचा , ती अर्थ समजून जाते ,

दुखाच्या क्षणी, ती धीर देत असते ,
तर सुखामध्ये, आनंद द्विगुणीत करत असते ,

नशीबवान आहे मी , मला खऱ्या मैत्रीचा सहवास लाभला ,
आणि ....खर्या मैत्रीचा शोध माझा fb var  संपला .

सौ.अर्चना कुलकर्णी .
22/06/2011 

मुक्ताफळे

सामान्यांचा जीव जाणार,
राजकारणी त्यातून खेळ खेळणार
भाषणांच्या फैरी झाडणार
२-५ लाखाची मदत करणार
त्याला मिडिया मलम म्हणणार
आपण सारे हा तमाशा बघणार !
 अर्चना १५/७/२०११
 सतत वाटत राहते
तुझ्या भेटीची हुरहूर
मनात मात्र..
तुझ्याच आठवणींचे काहूर..

 अर्चना १५/७/२०११

फेस बुक

फेस बुक

आज काल फेस बुक वर झाले ग्रुप्स भारी ,
जो तो उठून नवी गुढी उभारी,
प्रत्येक ग्रुप चा विषय च न्यारा
मुंबई,पुणे ,नासिक अशी शहरे झाली बारा,
मैत्री वरून निघाले ग्रुप्स सारे अठरा
सर्वत्र  तीच पोस्ट ,तरी प्रत्येकाला आपला ग्रुप प्यारा ,
ग्रुप आपला ठरावा सरस
अशी असते एकमेकात छोटी सी चुरस 
आपण व्हावे सर्वात FAMOUS ,
त्याकरिता कोणी कोणाचे करत नाही JEALOUS

कुठे चालतो मनाचा खेळ
तर कुठे जातो नुसताच वेळ
छोट्या -मोठ्यांचा जमतो चांगला मेळ
आणि मग खायला मिळते सुंदर शी भेळ

कधी कोणी म्हटले करा जरा विषयाला धरून पोस्ट
कि झाले च सार्यांचे हुप्प
म्हणे तुम्हाला कळत नाही आमचे कष्ट
मग admin  लाच  सारे म्हणती तुम्ही राहा जरा गप्प.
जुनी च कविता कोणी टाके ५० ठिकाणी
तर कोणी भिंतीवरच गप्पा मारी
सारख्या सारख्या notiifications  जीव होतो हैराण
पण न राहावे ग्रुप मध्ये तर जीवन होते वैराण 
एक मात्र नक्की आहे
सर्वांचा उद्देश एक च आहे
मैत्री वाढवू या ,
मैत्री चे नाते सांभाळूया !

Archana ...(Dec 2011 )