या सख्यानो या करिता माझ्या मनातले काही ,
जन्मले तेव्हाच , नात्याचे जाळे तयार होते ,
तरीहि जगताना , खऱ्या मैत्रीच्या शोधात होते ,
मैत्री" , शब्द उच्चारताच, आपलेपणाची जाणीव होते,
मनही मग दुख, पेलला हसत-हसत तयार होते,
गरज नसते दाखल्याची , जेथे असतो फक्त विश्वास ,
मैत्रीच्या या नात्याची , बात च असते काही खास ,
इतर नात्यापेक्षा, हे नाते काहीतरी वेगळे असते,
न बोलता मनातील वेदना एकमेकांना कळत असते ,
नेहमी चांगल्या विचारांची , जाणीव मैत्री करून देते ,
आपल्या अबोल्याचा , ती अर्थ समजून जाते ,
दुखाच्या क्षणी, ती धीर देत असते ,
तर सुखामध्ये, आनंद द्विगुणीत करत असते ,
नशीबवान आहे मी , मला खऱ्या मैत्रीचा सहवास लाभला ,
आणि ....खर्या मैत्रीचा शोध माझा fb var संपला .
सौ.अर्चना कुलकर्णी .
22/06/2011