चित्र काव्य
आयुष्याच्या संध्याकाळी
बसले मी उंबऱ्याशी
वाट पाहते माउली
कसे समजावू मनाशी?
पंखात येता बळ
पिल्लं गेली उडूनी
सरत राही काळ
कोणी ना येई परतोनी
आशा तरीही मनात
येईल कोणा याद
ओढ अजुनी नजरेत
होईल स्वप्न साकार
येतील काही काळासाठी
गोड शब्द येतील कानी
घरास करतील रंगरंगोटी
होईन मी त्यात समाधानी!
अर्चना कुलकर्णी....
7/6/2022