Wednesday, 12 April 2017

पाऊस

पाऊस

पहिला पाऊस उधाणून आला 
मातीचा गंध नसानसात भिनला 
हळूच  मला खुणावू लागला 
चल सज्ज हो भिजायला 

२) 
वळवाचा पाऊस अन 
त्यात वेड्यासारखे भिजणे 
हरपलेले मन अन 
भान विसरून पाहणारा तो 
लाजणारी मी अन 
तगमगणारा तो ,
बावरलेलें मन ,
हळूच त्याच्या मिठीत 
सामावणारे तन !


अर्चना 
२०/६/२०१५

Sunday, 2 April 2017

माणूस

माणूस व प्राणी

शाम ला आई वडिलांनी  खूप लाडात वाढवले, नेहमी तो म्हणेल ते देत गेले. पण लग्नानंतर तो बदलला आई वडिलांशी नीट वागेना , घरी पैसे देत नसे, शेवटी आई बाबांनी त्याला वेगळे राहण्यास सांगितले , तो ही आपल्याला काही वस्तू हव्यात असे म्हणून घरातून कित्येक वस्तू घेऊन बाहेर पडला.
वर्षभरात बाबा आजारी झाले, त्याला बोलावून देखील तो आला नाही. उलट आता माझी गरज का? असे म्हणून बघत राहिला.सुदैवाने बाबांची पेन्शन होती, त्यामुळे योग्य उपचार मिळून ते बरे झाले.



सकाळीच आमच्या समोर च्या सोसायटी मधील काका आपल्या गावठी कुत्र्याला घेऊन बाहेर पडले.रस्त्यावर कडेला घेऊन त्याच्या मानेचा पट्टा काढला , म्हणाले जा आता तू. तो लाल्या त्यांच्याजवळ च पायापाशी घोटाळत उभा राहिला...
नाईलाजाने काकांनी दगड उचलला व हाड हाड  लाल्या करत त्याच्यावर भिरकावला.
पाळलेला कुत्रा त्याला का बरे हाकलले असावे असा मी विचार करत होते. तितक्यात काकांनी दुसरीकडे तोंड फिरवून जायला सुरुवात केली व एका मोठ्या दगडाला अडखळून पडले, दुसरे कोणी त्यांना उठवायला येण्याच्या आता लाल्या चपळपणे   आला, व त्यांचे सर्व अंग चाटू लागला, ते हि त्याच्या गळयात हात टाकून रडू लागले,

माणसातला इगो माणसा माणसात दुरावा निर्माण करतो आहे का ? 





अर्चना कुलकर्णी
2/4/17

मन

मनातले दु :ख सांगून हलके होते ,पण ते प्रत्येकाला व्यक्त करता  असे नाही . ते कोणाजवळ व्यक्त करावे या बाबतीत मनात साशंकता असते . जगी सर्व सुखी असा कोण आहे ? असे म्हटले जाते च , म्हणजे च प्रत्येकाला काही ना काही दुःख असते च . दुःख असणे आणि ते दाखवणे किंवा ते सहन  करणे हे प्रत्येकाचे वेगवेगळे असते . काही जण दुःख असताना खूप काळजीत /चिंतेत आहोत असे वारंवार बोलून दाखवतात , तर काही जण न बोलता सहन करतात . 
ज्यावेळेस दुःख हे शारीरिक असते तेव्हा ते सर्वाना दिसते , पण ते समजण्याची पातळी सर्वांची असते असे नाही ,त्यामुळे काही जण कोणाला न सांगता सहन करतात, शांतपणे निभावतात .  पण कधी अति जवळच्या माणसाचे शारीरिक आजार असतात , त्यावेळेस सहन करणे हे केवळ अशक्य होते , अशा ही परिस्थितीत धीराने उभे राहताना जवळ च्या माणसांनी समजून घेणे खूप आवश्यक असते . 
काही ना असे वाटते की आपले  दुःख  इतरांना सांगून त्याचा बाजार मांडू नये , पण नेमके त्याच वेळेस आपली माणसे विरुद्ध वागतात . मग होणार त्रागा , त्यामागची भावना समजून न घेता त्याच्यापासून दूर जातात . .आणि आर्थिक बाजू जर कमकुवत  असेल तर,व्यक्ती नुसती कमजोर होत  नाही तर ती अनेकदा लाचार होते . पण ऐकणारे कोणी नसते, त्यामुळे येणारे नैराश्य , मनाची कोंडी ...... 
अशा वेळेस एखादा मित्र किंवा मैत्रीण आपल्या साहाय्याला येते , न बोलता सर्व समजून घेते , आर्थिक मदतीची अपेक्षा नसते ,पण मानसिक साहाय्य खूप मोलाचे ठरते . आपल्याकरिता कोणी तरी आहे ही भावना त्याला दुःखातून तारून  न्यायला मदत करते ...
.  
काही जण कोणाला न सांगता आपल्या दुःखाचा सामना करतात .त्यातून बाहेर येतात
तेव्हा इतर  म्हणतात ,"अहो त्यांनी मदत नाही मागितली आम्ही नसती का केली?"

म्हणजे मदत मागितली तर तुम्ही करणार ? मग त्यात आपलेपणा कसा ? न मागता , न बोलता केलेली मदत ही मोलाची नव्हे का ? 
पुढे जाऊन मग म्हटले जाते की घरातल्या पेक्षा ह्यांना बाहेर चे जवळ चे वाटतात , 
त्यावेळेस काय वाटते ? 


अर्चना 

१/४/२०१६