Sunday, 2 April 2017

मन

मनातले दु :ख सांगून हलके होते ,पण ते प्रत्येकाला व्यक्त करता  असे नाही . ते कोणाजवळ व्यक्त करावे या बाबतीत मनात साशंकता असते . जगी सर्व सुखी असा कोण आहे ? असे म्हटले जाते च , म्हणजे च प्रत्येकाला काही ना काही दुःख असते च . दुःख असणे आणि ते दाखवणे किंवा ते सहन  करणे हे प्रत्येकाचे वेगवेगळे असते . काही जण दुःख असताना खूप काळजीत /चिंतेत आहोत असे वारंवार बोलून दाखवतात , तर काही जण न बोलता सहन करतात . 
ज्यावेळेस दुःख हे शारीरिक असते तेव्हा ते सर्वाना दिसते , पण ते समजण्याची पातळी सर्वांची असते असे नाही ,त्यामुळे काही जण कोणाला न सांगता सहन करतात, शांतपणे निभावतात .  पण कधी अति जवळच्या माणसाचे शारीरिक आजार असतात , त्यावेळेस सहन करणे हे केवळ अशक्य होते , अशा ही परिस्थितीत धीराने उभे राहताना जवळ च्या माणसांनी समजून घेणे खूप आवश्यक असते . 
काही ना असे वाटते की आपले  दुःख  इतरांना सांगून त्याचा बाजार मांडू नये , पण नेमके त्याच वेळेस आपली माणसे विरुद्ध वागतात . मग होणार त्रागा , त्यामागची भावना समजून न घेता त्याच्यापासून दूर जातात . .आणि आर्थिक बाजू जर कमकुवत  असेल तर,व्यक्ती नुसती कमजोर होत  नाही तर ती अनेकदा लाचार होते . पण ऐकणारे कोणी नसते, त्यामुळे येणारे नैराश्य , मनाची कोंडी ...... 
अशा वेळेस एखादा मित्र किंवा मैत्रीण आपल्या साहाय्याला येते , न बोलता सर्व समजून घेते , आर्थिक मदतीची अपेक्षा नसते ,पण मानसिक साहाय्य खूप मोलाचे ठरते . आपल्याकरिता कोणी तरी आहे ही भावना त्याला दुःखातून तारून  न्यायला मदत करते ...
.  
काही जण कोणाला न सांगता आपल्या दुःखाचा सामना करतात .त्यातून बाहेर येतात
तेव्हा इतर  म्हणतात ,"अहो त्यांनी मदत नाही मागितली आम्ही नसती का केली?"

म्हणजे मदत मागितली तर तुम्ही करणार ? मग त्यात आपलेपणा कसा ? न मागता , न बोलता केलेली मदत ही मोलाची नव्हे का ? 
पुढे जाऊन मग म्हटले जाते की घरातल्या पेक्षा ह्यांना बाहेर चे जवळ चे वाटतात , 
त्यावेळेस काय वाटते ? 


अर्चना 

१/४/२०१६ 

No comments:

Post a Comment