Monday, 29 October 2012

आठवणीच्या झुल्यावर ....



आठवणीच्या झुल्यावर झुलताना
अनेकदा मी अनुभवलंय
पहिल्या प्रेमाच्या आठवणीत
पाय  जमिनीवर ठरत च  नाहीत ,
इंद्रधनुषी स्वप्नाला हात लावल्याखेरीज
झुला खाली येत च नाही .....l १ l
शाळेतल्या आठवणी तर अफाट आभाळासारख्या
कधी हळुवार पावसाने चिंब करून

मनाला सुखावतात
तर कधी धुव्वाधार  कोसळून
आपले श्वास च गुदमरतात
मैत्रीच्या- द्वेषाच्या ह्या विविध रंगात
फुलपाखरागत हवेत च तरंगतात l 2l

नातातल्यांच्या आठवणी
महासागरागत खोल असतात ,
कधी संथ शांत असतात
आपणास संयमित करतात
तर कधी बेभान  होवून
किनार्यावर आपटून घेणाऱ्या लाटेगत
आपलाच खेळ करत राहतात l ३ l
आठवणी ह्या फक्त आठवणीच असतात
कधी जागेपणी पाहिलेली गोड स्वप्ने असतात
तर कधी बोचरी होवून झोप ओरबाडून नेतात
न संपणारे रंग लेवून फिरतात अन फिरवतात
म्हणून च  आठवणीशिवाय जगणे अशक्य करतात l ४ l


अर्चना ,ठाणे .9 -10 -12

Tuesday, 23 October 2012

देवीची आरती


प्रथम दिनी  आई भवानी आली लाल रंगात
आठव दिधली तुझ्या आहे मी रक्तात !१! 


दुसरे दिनी माय रेणुका आली आकाशी रंगात
म्हणे मजसी माया आहे तुजवर आभाळागत !२ 


तृतीय दिनी गौरी माता  आली पीत रंगात
घालून देत असे हळदीगत भक्तीची रीत जगात !३!
 


चौथे दिनी अन्नपूर्णा माउली  प्रगटली हिरव्या रंगात 
सांगे  श्रद्धेने काम करता समृद्धीची होई बरसात !४!...
पंचम दिनी काली माँ  अवतरली करड्या रंगात
विसरू नको प्रेमळ धरणीशी नाते ,सांगे कानात !५ !


सहावे दिनी जगतजननी अम्बा अवतरली केशरी रंगात
देण्या सर्वा  आशिष, रहा सतत उत्सवी आनंदात !६!

सातवे दिनी शुभ्र वस्त्र लेवुनी आली सरस्वती स्वप्नात
सांगे बुद्धी अन पवित्र वाचा याने मान लाभे विश्वात ! ७ !
 आठवे दिनी आई सप्तशृंगी प्रगटली गुलाबी रंगात
गावया अलौकिक ,सुमधुर ,पावन प्रीतीचे संगीत !८!
नववे दिनी लक्ष्मीमाता अवतरे जांभूळ  रंगात
जिच्या प्रेमळ   कृपेने जगती होई भरभराट ! ९ !
देवी  माता रंगे  नवरात्रीला   नऊ रंगात 
भक्तगण  होई  दंग  तिच्या  उपासनेत  !१० !
देवीची  अगाध  महती  जाणुनी आरती म्हणतात 
सर्व दुखः -संकटे  विसरुनी  मनी हर्षतात !११ !

Wednesday, 10 October 2012

नाते

आपले अबोल  नाते

ते शब्दांत नाही समजवायचे
डोळ्यांतुन समजुन घ्यायचे
अन मनाने सजवायचे
अस्वस्थ मनाला  सावरायचे
अन कोवळ्या भावनेला जपायचे
नकळत हि न दुखवायचे
अन अश्रू येण्यापूर्वीच गोंजारायचे
चुकीच्या रस्त्यावरून परत आणायचे
अन कधी हि एकटे न सोडायचे !
कधी नाही रुसायचे
अन नाते आपले फुलवायचे !

अर्चना ...

आठवणी -


 आठवणी -
मनात आज धरला आहे आठवणीनी फेर ,
त्यामुळेच  मन  आहे आज सैरभैर
कधी जवळच्या सखीगत  हसवतात
तर कधी अनोळखी बनून फसवतात
भूतकाळातून वर्तमानात यायला नको म्हणतात
अन दिवसाचे तास त्यात च हरवतात....
खरोखर अशी जर मनाची स्थिती आपली बरेचदा होते . भूतकाळात च मन दंगून जाते .
प्रत्येक सणाला आपले मन FLASH BACK  मध्ये जाते .लहानपणीची आठवण मन ताजेतवाने करून जाते . राष्ट्रीय सणांविषयी सुद्धा शालेय जीवनातल्या आठवणी असंख्य असतात . शिक्षकांच्या आठवणी निघाल्या की मन अगदी मोंटेसरीच्या वर्गात जावून बसते ....ते शाळा सोडेपर्यंत भेटलेले अनेक शिक्षक -शिक्षिकांच्या आठवणीत रममाण होते .पण मनाला एक वेगळाच आनंद, उत्साह देवून जाते .
सिनेमात FLASH BACK  दाखवून आपले मनोरंजन केले जाते . त्यातला सर्वात माझ्या लक्षात राहिलेला FLASH BACK  मैंने प्यार किया मधील कबुतराचा FLASH BACK . माझ्या मते कबुतराचा FLASH BACK  असलेला तो एकमेव चित्रपट असेल.
आपल्या मनात कधी तरी कोणी सांगितलेले एखादे चांगले वाक्य किंवा घटना मनात घर करून राहते , ती आठवली कि पुन्हा नवीन जिद्द निर्माण होते .अशा आठवणीत अडकणे केव्हा हि चांगले ठरू शकते .

पण जेव्हा एखाद्याविषयी किंवा घटनेविषयी राग ,तिरस्कार निर्माण होवू शकतो ,तेव्हा  तशा आठवणीत न गुंतता पटकन दुसरे काम हाती घ्यावे नाही तर  तो  ही दिवस आपला रहात नाही .कटू आठवणीपासून दूर राहावे .कटू आठवणीतून द्वेष ,तिरस्कार जास्त वाढीला लागतो .कॉम्पुटर प्रमाणे तिथे ही पटकन डिलीट मारून पुढे जावे .
सुखाच्या ,आनंदाच्या ,चांगल्या क्षणांच्या आठवणीच्या झुल्यावर बसून फिरून यावे , मन उत्साहाने कामाला सुरुवात करते, आपल्याबरोबर इतरांचे ही जीवन आनंदमय होते ....



अर्चना ...10 /10/2012 .

Monday, 1 October 2012

पाऊस

या कातरवेळी आला अवचित पाऊस
कडाडली वीज अन झाला तुझा भास !
आठवली ती भेट जेव्हा नव्हते कोणी आसपास
आज मात्र ,भिजली जरी गात्र तरी मन उदास !
अर्चना .
....


 ढगात साठलेला पाऊस गडगाडाटासह  बरसला
अन तप्त धरणीला शांत करून गेला
तुझ्या  आठवांचा पाऊस अलगदच डोळ्यावाटे झिरपला
अन मनासह शरीराला दाह देवून गेला !

अर्चना ....
.1-10 -2012