Tuesday, 25 September 2012

विरक्ती !

असे अचानक कधी तरी
रिक्त होतात मनाच्या खोल्या,
नि बंद  पडून राहतात कवाडे  ,
नको तो सूर्याचा प्रकाश
हवा वाटे जीवघेणा अंधार
पाउल नको टाकू  बाहेर,
की डोकवू नको  कुठे,

वाटे  पडून रहाव निपचित
आपल्याच  मनाच्या भावना निरखत !
नको कोणाच्या शब्द्खुणा
नको गर्दीच्या पाऊलखुणा

नको कसली हि आसक्ती
अशी च पोसावी विरक्ती !

अर्चना कुलकर्णी ,ठाणे

No comments:

Post a Comment