नाही विसरता येत.....
मन किती वेडे असते,
कोणालाच ते दिसत नसते
सारे काही साठवून ठेवते
रिकामे बसले की आठवत राहते.
आठवणी पण वेड्याचं असतात
सुखद आठवणी थोडा वेळच थांबतात
दुःखद आठवणी मात्र रेंगाळत राहतात
विसरायला गेले तरी नाही विसरता येत
जराश्या धक्क्याने उसवतात
डोळ्यावाटे बाहेर पडू पाहतात
पटते जरी घडून गेले विसरून जावे
परि ते कसे जमवावे?
अर्चना कुलकर्णी. .
No comments:
Post a Comment