माझा तिच्या वर खूप विश्वास होता, प्रेम , आपुलकी सारे ही होते.ती देखील तसे च वागत होती, म्हणून तर नाते जपले जात होते.
पण अचानक माझ्यावर आघात झाला, दवाखाना ,हॉस्पिटल मागे लागले, भेटायला आलीच नाही.
तरी मी शांत होते, मग म्हणाली उद्या सकाळी 8 ला मला वेळ आहे,तेव्हा येते भेटायला.
ठीक म्हणून फोन बंद केला. दुसऱ्या दिवशी भेटायला आली, खाणे झाल्यावर म्हणाली , तुला पैसे लागणार असतील तर 8 दिवस आधी सांग सगळे FD त आहेत, पैशाची मदत करेन पण हॉस्पिटल किंवा नंतर माणसाची (मनुष्यबळ) मदत आम्ही नाही करू शकणार!
त्यानंतर 6 महिन्यात साधा फोन देखील नाही.
असे नाते जपणे शक्य आहे का ?
(एक नाते सोडले ह्या पोस्टवरन मी सोडलेले नाते आठवले )
No comments:
Post a Comment