माझ्या भावना लिहिते आहे...
आपली शक्ती
आपल्या हातात,
आपली भक्ती
आपल्या मनात,
सकाळी उठताच
करावे भूमातेला नमन,
पाणी पिऊन करावे
अनुलोम विलोम,
दीर्घ श्वसन थोडे
योग प्रकार सोपे,
न विसरता करावा
हास्य योग,
दोन्ही हातानी वाजवावी टाळी
आवाज भरून घ्यावा कानी,
स्मरण करून आराध्याचे
मी सुदृढ आहे हे घ्यावे मनी,
दिवस होईल मग प्रसन्न
जातील हे परीक्षेचे क्षण!
अर्चना कुलकर्णी. नाशिक
No comments:
Post a Comment