Thursday, 10 January 2019

मैत्री (नासिक मैत्रीणकरिता)

निव्वळ दोन शब्दांची साद असते
भेटू या ?
तिला वेळेचे बंधन नसते,
फक्त भेटीची ओढ असते.
त्याच भावनेने ती भेटते
तेव्हा ती फक्त मैत्री असते
किती वेळ भेटलो हे महत्वाचे नसते
तर भेटीतील उत्कटता महत्वाची असते
म्हणून कधी ही भेटले, तरी
बराच काळ ताजीतावानी वाटते
बकुळीच्या फुलासम सुगंधी राहते
अशी आपली मैत्री सदैव आठवत राहते

अर्चना
6/1/2019

No comments:

Post a Comment