Wednesday, 17 February 2016

तिन्ही सांज

तिन्ही  सांज

काल ठाण्यात नाट्यसंमेलना निमित्त असणाऱ्या नाटकात , " तिन्हीसांज" ह्या नाटकाची वर्णी लागली होती

. काशिनाथ प्रेक्षागृह प्रेक्षकांनी भरून गेले होते . शेखर ताम्हाणे लिखित ,राजन ताम्हाणे निर्मित , संपदा जोगळेकर - कुलकर्णी दिग्दर्शित हे नाटक सर्वच बाबतीत  एका वेगळ्या उंचीवरचे आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये . नाटकाचा कालावधी १९३६ ते १९५० च्या दरम्यानचा आहे .कथेचा कालखंड म्हणजे संस्थाने खालसा झाली त्यादरम्यानचा . कोणा एका संस्थानिकाचा गायनात निपुण  मुलगा त्याचे राज नर्तिकेवर असलेले प्रेम … ते समाजाने नाकारणे … त्यानंतर त्याने गाणे पूर्णपणे सोडणे … पुढे बरेच काही रहस्यमय ते नाटक बघितल्यावर च कळेल . 
 नाटक इतक्या खुबीने लिहिले आहे की  क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत रहाते , नेपथ्य अतिभव्य असे  लागेल . रंगमंचावर पडणारा पाऊस हे तर अतिउत्कृष्ट म्हणवे लागेल . संपदा जोगळेकर -कुलकर्णी यांचे दिग्दर्शन ह्या नाटकाला लाभले आहे , त्यामुळेच नाटकातील नृत्य हे खरेखुरे ताल बद्ध लय बद्ध होते .
संगीत - रहस्य - प्रेम ह्या तिन्हीचा संगम ह्या नाटकात आहे , आशयघन  लेखन  -  हुबेहूब  नेपथ्य - उत्तम दिग्दर्शन ,सर्वच कलाकारांनी समरसून केलेले काम ह्यामुळे हे नाटक कायम लक्षात राहील . सर्वांनी आवर्जून पाहावे असे रहस्यमय प्रेम नाट्य !
निर्मिती : त्रिकूट लेखक : शेखर ताम्हाणे
 दिग्दर्शन : संपदा जोगळेकर-कुलकर्णी
 नेपथ्य : संदेश बेंद्रे
कलाकार - अंगद म्हसकर ,शीतल क्षीरसागर ,शाल्मली टोळ्ये , श्रीराज ताम्हनकर व इतर 
 संगीत : परीक्षित भातखंडे
विशेष सहाय्य - वेदश्री ओक 
 प्रकाश : राजन ताम्हाणे - 

अर्चना कुलकर्णी 
१८/०२/२०१६ 

No comments:

Post a Comment