नक्की सांगा तुम्हाला काय वाटते ?
गोष्ट काल संध्याकाळ चीच आहे, दाराची बेल वाजली. दारात एक महील उभी होती .आपण अर्चना कुलकर्णी न ?हो ...
मला तुमची पाच मिनिटे हवी आहेत ,आणि मला सांगा माझे काय चुकले ?
माझे नाव रश्मी ,माझा नवरा रमेश IT ENGINEER चांगल्या मल्टी नशनल कंपनीत वरिष्ठ हुद्द्यावर कामाला आहे . आमच्या लग्नाला १५ वर्षे झाली आहेत . मला दोन मुले आहेत . मी स्वतः मुनिसिपाल शाळेत शिक्षिका आहे .लग्न झाल्यापासून च माझी नोकरी हा घरच्यांचा चेष्टेचा विषय आहे. मुनिसीपाल्टी शाळेत कोणी शिकवते तरी का ? असा च सूर असतो ...त्यामुळे माझ्या कामाचे स्वरूप किंवा अडचणी कोणी समजून घेतल्या नाहीत .घरी सर्व जेवण मी बनवायचे पण माझा डबा मी भरू लागले तर सासूबाई म्हणाल्या शाळेत असतो न तुमच्या नाष्टा ,जेवण कशाला उगाच घरून नेतेस...पण नोकरी सोड असे हि म्हटले नाही , त्यात च मी समाधानी होते. पगाराची रक्कम पूर्णपणे नवर्याकडे द्यायची आणि मग दररोज तो खर्चाचे पैसे देतो , म्हणजे कधी शाळेत कशाची वर्गणी निघाली कि मी च फक्त अशी कि सांगणार उद्या देते. आज नाही आहेत, खूप लाजिरवाणे वाटे ,पण तसे च चालू आहे .....मुले झाली त्यांच्या शाळा सुरु झाल्या ,मी अभ्यास घेते असे म्हणण्यापूर्वीच रमेश म्हणाला ,आई कडून नको रे शिकू,पास होशील कि नाही हि शंका.....अगदी पहिलीपासून शिकवणी बाहेर लावली .मग IT ला थोडे वाईट दिवस आले ,तेव्हा शिकवणी सोडायला लागली आणि मी मुलांना शिकवू लगले .बाकी कोणती हि गोष्ट मला लागली ,मी मागितली कि मिळते . तिथे कुठे हि कमी नाही अगदी दिवाळीला दहा हजाराची साडी पण घेतील ,मी म्हटले तर ...स्वतः हून कधी च काही आणत नाहीत .आणि कधी कशाला चांगले म्हणत नाहीत ..
.
.
.
असेच दिवस चालले होते ,६ वर्षापूर्वी नवीन जागेत आलो ,मोठी जागा ,हवेशीर प्रशस्त खोल्या खूप आनंद झाला . तेव्हाच शेजरचे दया आणि दीप्ती आले .ते हि नवीन च होते. ओळखी झाल्या .दया ने ओळख करून दिली ,तो एका खाजगी शाळेत नोकरीस होता ...मी मुनिसिपाल्तीत आहे हे कळल्यावर लगेच च म्हणाला अरे वाह ,खूप CHALLENGES असतात अशा नोकरीत. गरीब -मध्यमवर्गीय ..वेगवेगळ्या समाजातील ,तसे त्यांना सांभाळून घेवून शिकवणे अवघड असते .घरी कधी कधी शिक्षणाचे महत्व नसते ,तेव्हा मुलांना अभ्यासाचो गोडी लावणे पण करायला लागत असेल ना ? ...किती बारकावे जे मला हि कधी जाणवले नव्हते , किंवा ज्याचा मला कधी अभिमान वाटला नव्हता ते आज दयाच्या बोलण्याने मिळाला .
/
.
मग कधी बाहेर कुठे भेटलो ,कि शाळेबद्दल च बोलत असू . त्याच्या शाळेतल्या "यशस्वी दहावी " वर्गाबद्दल ..तर कधी माझ्या शाळेबद्दल ...घरी येवून रमेश ला सांगत असे , मग एकदा रमेश म्हणाला तू जास्त दयाशी बोलू नकोस .तो माझ्यासारखा नाही आहे ,मी स्व कमाई ने हि जागा घेतली आहे ,तर त्याने गावाकडचे घर विकून घेतली आहे ... मी म्हटले माझी कमाई ? तर लगेच च हसून उत्तरला विचार तुझ्या शाळेत ५० लाख लोन तरी देतील का ?.......मला वाटते इथे कुठे तरी मनात तुटले .....
त्यानंतर मी आणि दया कधी कधी भेटत असू ,फक्त घरी बोलत नसे .चार वर्षापूर्वी माझी बदली दयाच्या शाळेजवळ च्या शाळेत झाली .त्यानंतर आमचे भेटीचे प्रमाण वाढले . मला आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आणि मी पहिला फोन दयाला केला . तो हि शाळा सुटताच पेढ्याचा पुडा घेवून आला . घरी जेव्हा सांगितले , पुरस्काराबाबत ..तेव्हा प्रश्न आता अजून किती शिक्षिका बाकी आहेत पुरस्कार न मिळालेल्या ? एक एके वर्षी एकेकिला द्यायचा ...त्यात काय....
आता आमच्या दोघांच्यात जे भावनिक नाते निर्माण झाले आहे ,त्याबद्दल काही सांगता येत नाही , पण त्या शिवाय जगणे विचार करू शकत नाही .कुठलेही शारीरिक संबंध नाहीत . पण एकेम्कांचा भावनिक आधार मला खूप मोलाचा वाटतो .
.
.
.
पण दयाच्या घरचे काय, असे वाटत असेल ना ? त्याचे लग्न ठरवून झालेले .तो मुळचा सोलापूर चा ,त्याच गावात दीप्ती चे माहेर आहे .मुलगा मुंबई ला चांगल्या शाळेत शिक्षक आहे , आई-वडिलांनी ठरवून रीतसर लग्नझाले. वर्षाभर छान चालले होते. मग तिच्या बहिणीने गुजराती मुलाशी लग्न केले ,तो खूप श्रीमंत आहे . अजून धाकट्या बहिणीने डॉक्टर शी लग्न केले . आणि मग दीप्ती ची कुरबुर सुरु झाली . बहिणी कशा छान छान साड्या घेतात ,दागिने घालतात ....स्त्री चे विचार म्हणून दया दुर्लक्ष करी .मग तिच्या वडिलांचा ६० चा वाढदिवस आला .तिच्या आई-वडिलांना काहीतरी द्यावे म्हणून दया खूप मागे लागला ,पण दीप्ती ने हट्टाने घेतले नाही . वर तिथे जावून आई-वडिलांना सांगितले कि तुम्ही च शोधून दिलात न मास्तर ...मग आता आम्हाला काही द्यायला परवडत नाही ... सर्वांसमोर मुद्दाम आई ने घेतलेल्या नवीन २ door फ्रीज समोर फोटोज काढले ,जणू दया आणि दीप्ती नेच तो दिला आहे असे नातेवाईकांना वाटावे...
.
.
त्यानंतर प्रत्येक वेळेस ती आई-वडिलांनाच दोष देई ...मग आई -वडील बहिणी कोणी बोलावेनाश्या झाल्या. मग घरात आदळआपट आपण गरीब ,आपल्या ला मान नाही ...मोठी असून आई -वडील मला विसरले ....दयाची आई निवर्तल्यावर गावाकडचे घर विकून हा ब्लोक घेतला . शाळा आणिटुश्यंस घेवून दया दिवसभर कमावतो पण घरी कधी चांगले जेवायला हि मिळत नाही.... कटकट तर दर एक दिवसाआड असते च कारण काही हि पुरते ...तरी हि संसार सुरु आहे ....
.
आता कधी तरी मी त्याच्याकरिता पण डबा नेते...आम्ही एकमेकांना सर्व गोष्टी सांगतो कधी त्यामुळे हळवे होवून रडतो देखील....खूप जिवलग मैत्री च म्हणेन मी ..भाऊ -बहिण असली खोटी नाती म्हणायची नाहीत मला....
आनंदाच्या वेळेस किंवा अडचणीच्या वेळेस प्रथम त्याची च आठवण येते , मग कधी कधी अपराधी वाटते ...आर्थिक ,सामाजिक, शारीरिक कसले हि कमी नसताना हे असे का झाले ?
आणि मग मी परत स्वतः ला समजावते तुझे बरोबर आहे ,पण मला सांगा अशी मैत्री समाजात मान्य होईल का ? कोणी विश्वास ठेवेल का ? कोणतेही शारीरक संबंध नसलेली स्त्री -पुरुष मैत्री समजून घेतली जाईल का ?
..
अशी मैत्री करणे आज तरी चुकीचे मानले जाते , मग आता मला सांगा माझे कुठे चुकले ? मी तुमच्या दृष्टीने ति-हाईत आहे , आणि तीऱ्हायीतच्या नजरेतून तुम्हाला काय वाटते ?
अर्चना कुलकर्णी
२/११/२०१२
गोष्ट काल संध्याकाळ चीच आहे, दाराची बेल वाजली. दारात एक महील उभी होती .आपण अर्चना कुलकर्णी न ?हो ...
मला तुमची पाच मिनिटे हवी आहेत ,आणि मला सांगा माझे काय चुकले ?
माझे नाव रश्मी ,माझा नवरा रमेश IT ENGINEER चांगल्या मल्टी नशनल कंपनीत वरिष्ठ हुद्द्यावर कामाला आहे . आमच्या लग्नाला १५ वर्षे झाली आहेत . मला दोन मुले आहेत . मी स्वतः मुनिसिपाल शाळेत शिक्षिका आहे .लग्न झाल्यापासून च माझी नोकरी हा घरच्यांचा चेष्टेचा विषय आहे. मुनिसीपाल्टी शाळेत कोणी शिकवते तरी का ? असा च सूर असतो ...त्यामुळे माझ्या कामाचे स्वरूप किंवा अडचणी कोणी समजून घेतल्या नाहीत .घरी सर्व जेवण मी बनवायचे पण माझा डबा मी भरू लागले तर सासूबाई म्हणाल्या शाळेत असतो न तुमच्या नाष्टा ,जेवण कशाला उगाच घरून नेतेस...पण नोकरी सोड असे हि म्हटले नाही , त्यात च मी समाधानी होते. पगाराची रक्कम पूर्णपणे नवर्याकडे द्यायची आणि मग दररोज तो खर्चाचे पैसे देतो , म्हणजे कधी शाळेत कशाची वर्गणी निघाली कि मी च फक्त अशी कि सांगणार उद्या देते. आज नाही आहेत, खूप लाजिरवाणे वाटे ,पण तसे च चालू आहे .....मुले झाली त्यांच्या शाळा सुरु झाल्या ,मी अभ्यास घेते असे म्हणण्यापूर्वीच रमेश म्हणाला ,आई कडून नको रे शिकू,पास होशील कि नाही हि शंका.....अगदी पहिलीपासून शिकवणी बाहेर लावली .मग IT ला थोडे वाईट दिवस आले ,तेव्हा शिकवणी सोडायला लागली आणि मी मुलांना शिकवू लगले .बाकी कोणती हि गोष्ट मला लागली ,मी मागितली कि मिळते . तिथे कुठे हि कमी नाही अगदी दिवाळीला दहा हजाराची साडी पण घेतील ,मी म्हटले तर ...स्वतः हून कधी च काही आणत नाहीत .आणि कधी कशाला चांगले म्हणत नाहीत ..
.
.
.
असेच दिवस चालले होते ,६ वर्षापूर्वी नवीन जागेत आलो ,मोठी जागा ,हवेशीर प्रशस्त खोल्या खूप आनंद झाला . तेव्हाच शेजरचे दया आणि दीप्ती आले .ते हि नवीन च होते. ओळखी झाल्या .दया ने ओळख करून दिली ,तो एका खाजगी शाळेत नोकरीस होता ...मी मुनिसिपाल्तीत आहे हे कळल्यावर लगेच च म्हणाला अरे वाह ,खूप CHALLENGES असतात अशा नोकरीत. गरीब -मध्यमवर्गीय ..वेगवेगळ्या समाजातील ,तसे त्यांना सांभाळून घेवून शिकवणे अवघड असते .घरी कधी कधी शिक्षणाचे महत्व नसते ,तेव्हा मुलांना अभ्यासाचो गोडी लावणे पण करायला लागत असेल ना ? ...किती बारकावे जे मला हि कधी जाणवले नव्हते , किंवा ज्याचा मला कधी अभिमान वाटला नव्हता ते आज दयाच्या बोलण्याने मिळाला .
/
.
मग कधी बाहेर कुठे भेटलो ,कि शाळेबद्दल च बोलत असू . त्याच्या शाळेतल्या "यशस्वी दहावी " वर्गाबद्दल ..तर कधी माझ्या शाळेबद्दल ...घरी येवून रमेश ला सांगत असे , मग एकदा रमेश म्हणाला तू जास्त दयाशी बोलू नकोस .तो माझ्यासारखा नाही आहे ,मी स्व कमाई ने हि जागा घेतली आहे ,तर त्याने गावाकडचे घर विकून घेतली आहे ... मी म्हटले माझी कमाई ? तर लगेच च हसून उत्तरला विचार तुझ्या शाळेत ५० लाख लोन तरी देतील का ?.......मला वाटते इथे कुठे तरी मनात तुटले .....
त्यानंतर मी आणि दया कधी कधी भेटत असू ,फक्त घरी बोलत नसे .चार वर्षापूर्वी माझी बदली दयाच्या शाळेजवळ च्या शाळेत झाली .त्यानंतर आमचे भेटीचे प्रमाण वाढले . मला आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आणि मी पहिला फोन दयाला केला . तो हि शाळा सुटताच पेढ्याचा पुडा घेवून आला . घरी जेव्हा सांगितले , पुरस्काराबाबत ..तेव्हा प्रश्न आता अजून किती शिक्षिका बाकी आहेत पुरस्कार न मिळालेल्या ? एक एके वर्षी एकेकिला द्यायचा ...त्यात काय....
आता आमच्या दोघांच्यात जे भावनिक नाते निर्माण झाले आहे ,त्याबद्दल काही सांगता येत नाही , पण त्या शिवाय जगणे विचार करू शकत नाही .कुठलेही शारीरिक संबंध नाहीत . पण एकेम्कांचा भावनिक आधार मला खूप मोलाचा वाटतो .
.
.
.
पण दयाच्या घरचे काय, असे वाटत असेल ना ? त्याचे लग्न ठरवून झालेले .तो मुळचा सोलापूर चा ,त्याच गावात दीप्ती चे माहेर आहे .मुलगा मुंबई ला चांगल्या शाळेत शिक्षक आहे , आई-वडिलांनी ठरवून रीतसर लग्नझाले. वर्षाभर छान चालले होते. मग तिच्या बहिणीने गुजराती मुलाशी लग्न केले ,तो खूप श्रीमंत आहे . अजून धाकट्या बहिणीने डॉक्टर शी लग्न केले . आणि मग दीप्ती ची कुरबुर सुरु झाली . बहिणी कशा छान छान साड्या घेतात ,दागिने घालतात ....स्त्री चे विचार म्हणून दया दुर्लक्ष करी .मग तिच्या वडिलांचा ६० चा वाढदिवस आला .तिच्या आई-वडिलांना काहीतरी द्यावे म्हणून दया खूप मागे लागला ,पण दीप्ती ने हट्टाने घेतले नाही . वर तिथे जावून आई-वडिलांना सांगितले कि तुम्ही च शोधून दिलात न मास्तर ...मग आता आम्हाला काही द्यायला परवडत नाही ... सर्वांसमोर मुद्दाम आई ने घेतलेल्या नवीन २ door फ्रीज समोर फोटोज काढले ,जणू दया आणि दीप्ती नेच तो दिला आहे असे नातेवाईकांना वाटावे...
.
.
त्यानंतर प्रत्येक वेळेस ती आई-वडिलांनाच दोष देई ...मग आई -वडील बहिणी कोणी बोलावेनाश्या झाल्या. मग घरात आदळआपट आपण गरीब ,आपल्या ला मान नाही ...मोठी असून आई -वडील मला विसरले ....दयाची आई निवर्तल्यावर गावाकडचे घर विकून हा ब्लोक घेतला . शाळा आणिटुश्यंस घेवून दया दिवसभर कमावतो पण घरी कधी चांगले जेवायला हि मिळत नाही.... कटकट तर दर एक दिवसाआड असते च कारण काही हि पुरते ...तरी हि संसार सुरु आहे ....
.
आता कधी तरी मी त्याच्याकरिता पण डबा नेते...आम्ही एकमेकांना सर्व गोष्टी सांगतो कधी त्यामुळे हळवे होवून रडतो देखील....खूप जिवलग मैत्री च म्हणेन मी ..भाऊ -बहिण असली खोटी नाती म्हणायची नाहीत मला....
आनंदाच्या वेळेस किंवा अडचणीच्या वेळेस प्रथम त्याची च आठवण येते , मग कधी कधी अपराधी वाटते ...आर्थिक ,सामाजिक, शारीरिक कसले हि कमी नसताना हे असे का झाले ?
आणि मग मी परत स्वतः ला समजावते तुझे बरोबर आहे ,पण मला सांगा अशी मैत्री समाजात मान्य होईल का ? कोणी विश्वास ठेवेल का ? कोणतेही शारीरक संबंध नसलेली स्त्री -पुरुष मैत्री समजून घेतली जाईल का ?
..
अशी मैत्री करणे आज तरी चुकीचे मानले जाते , मग आता मला सांगा माझे कुठे चुकले ? मी तुमच्या दृष्टीने ति-हाईत आहे , आणि तीऱ्हायीतच्या नजरेतून तुम्हाला काय वाटते ?
अर्चना कुलकर्णी
२/११/२०१२
No comments:
Post a Comment