Friday, 9 August 2013

आठवणी

दुःख वाटून कमी होते ,
आठवणी वाटून संपत नसतात
त्या आठवणीचे मोल कोणाला जाणवत नाही



 आठवणी  ह्या अशाच असतात
कधी पटकन हसू हि आणतात
वाटून कधी संपत नाहीत
की  मोल इतरांना कळत  नाही
तर  ज्याच्या त्यालाच छळतात
इतके कि डोळ्यातून पाणी काढतात
जा म्हणून जात नाहीत
 आठवण काढ म्हणून येत नाहीत ……

आपण मात्र ठरवायचे
कोणत्या आठवणीत किती गुंतायचे
कसल्या आठवणीत रमायचे
आणि हसून -खेळून जगायचे

अर्चना .

No comments:

Post a Comment