लग्न झाल्यावर मुलगी नवऱ्याच्या घरी येऊन त्या घराला, माणसांना आपलंसं करायचा प्रयत्न करते. नवऱ्याच्या सर्व नातेवाईकांबरोबर संवाद साधते, नातं रूजवते. इतकंच नाही तर कित्येकदा नवऱ्याची फिरतीची नोकरीव्यवसाय असेल तर त्याच्याकडचे सर्व कार्यक्रम , बारशी बारावी त्याची प्रतिनिधी होऊन अटेंड करते. सासूचे प्रेमाने करते....
नवरा मात्र काही वेळा याउलट वागताना दिसतो. बायकोनं आपले नातेवाईक आपलेसे करावेत ही अपेक्षा असते, ती जेव्हा असं करते तेव्हा ते त्याला मनापासून आवडतं पण तो मात्र बायकोकडच्या कुठल्याही कार्यक्रमात कधीही जात नाही. तिच्या माहेरचं आहे, बघेल ती असा विचार असतो.अगदी भाऊ, बहिणींच्या लग्नातदेखील...बायकोला प्रत्येक वेळी , काय करणार, काम असतं बरंच अशी रेकॉर्ड कायम लावावी लागते.
माझ्या माहितीचे असे अनेक नवरे आहेतही की जे अगदी भक्तिभावाने बायकोबरोबर तिच्या माहेरी प्रत्येक कार्यक्रमाला जातात.
पण एकंदरच बायकोचं माहेर आणि तिची माणसं याबद्दल एक तिऱ्हाईत भाव ठेवून वावरणाऱ्यांचीही कमी नसते.
No comments:
Post a Comment