हरतालिका
पूजा ,उपास का करायचा ?हे कळण्याआधीच उपास सुरू झाला ,ते आईमुळे ! ती खूप देवभक्त होती , उपास सतत च असत ,पण पूजा खूप नसत! दररोज च्या देवाची पूजा तर मुलाचे सर्व आटोपून झाले की देव ! तोवर ती फक्त चहा वर असे हे देखील नंतर उमजू लागले.
हरतालिका व वटपौर्णिमा ह्या दोन्ही दिवशी मात्र अगदी साग्रसंगीत ,षोडपचारे पूजा !
हरतालिकेच्या आदल्या दिवशी च पत्री गोळा करून आम्ही मुले आणत असू. तेरडा ,आघाडा, डाळिंब,सीताफळ , प्राजक्त, ,अनंत , अशी अनेक पत्री जमा करत.कोणतीही पाने 5 पेक्षा जास्त आणू नका असे ती सांगे.रात्री 12 पर्यंत जागरण , त्यात ल्या मटार करंज्या अजून ही आठवतात.आई मात्र
रात्री सर्व पत्री नीट करून ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवत असे!
सकाळी लवकर उठून ,जस्वाद ,प्राजक्त ,गोकर्ण तसे च इतर काही फुले आम्ही आणत असू.
इमारतीमधील इतर ही 5/6 बायका जमत, आई पूजा करता करता च त्यांना देखील सांगे , व एका चौरंगावर सर्व जणी पूजा करत.दिवसभर फक्त पाणी अथवा शहाळ्याचे पाणी!
पण त्या पूजेचा उत्साह इतका की नकळत च उपास सुरू झाले , दिवसभर उपास करायचा ,संध्याकाळी उपासाचे पदार्थ☺ह्यात चैन !
आईचा उपसाचा स्टॅमिना जबरदस्त होता , ती फक्त शहाळ्याचे पाणी!
लग्नानंतर काही वर्षे आई कडे जाऊन पूजा केली, मग परदेशी जाणे झाले ,घरातच देवाला नमस्कार ! मुले लहान,ऑफिस ची घाई ह्या सर्वात घड्याळाकडे बघत पूजा करणे मला मान्य नाही झाले , उपास करत असे पण पूजा मांडणे बंद झाले।
त्यात काही वेळेस विकत आणलेली पत्री म्हणजे निव्वळ कचरा ,फुले शिळी हे बघून पूजा करणे बंद केले हे चांगले च झाले असे वाटायचे!
आज बरेच वर्षांनी पूजा केली , दारात उमललेली फुले , बागेतील पत्री गोळा करताना खूप मस्त वाटले.
😊परत लहान झाल्यासारखे च। मग तशी च पूजा केली.
देवपूजेने काही होत नाही इतपत मनाला माहीत असताना देखील पूजा करताना जे प्रसन्न वाटते ,त्याची तुलना कशाची च होत नाही!
पूजा ,उपास का करायचा ?हे कळण्याआधीच उपास सुरू झाला ,ते आईमुळे ! ती खूप देवभक्त होती , उपास सतत च असत ,पण पूजा खूप नसत! दररोज च्या देवाची पूजा तर मुलाचे सर्व आटोपून झाले की देव ! तोवर ती फक्त चहा वर असे हे देखील नंतर उमजू लागले.
हरतालिका व वटपौर्णिमा ह्या दोन्ही दिवशी मात्र अगदी साग्रसंगीत ,षोडपचारे पूजा !
हरतालिकेच्या आदल्या दिवशी च पत्री गोळा करून आम्ही मुले आणत असू. तेरडा ,आघाडा, डाळिंब,सीताफळ , प्राजक्त, ,अनंत , अशी अनेक पत्री जमा करत.कोणतीही पाने 5 पेक्षा जास्त आणू नका असे ती सांगे.रात्री 12 पर्यंत जागरण , त्यात ल्या मटार करंज्या अजून ही आठवतात.आई मात्र
रात्री सर्व पत्री नीट करून ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवत असे!
सकाळी लवकर उठून ,जस्वाद ,प्राजक्त ,गोकर्ण तसे च इतर काही फुले आम्ही आणत असू.
इमारतीमधील इतर ही 5/6 बायका जमत, आई पूजा करता करता च त्यांना देखील सांगे , व एका चौरंगावर सर्व जणी पूजा करत.दिवसभर फक्त पाणी अथवा शहाळ्याचे पाणी!
पण त्या पूजेचा उत्साह इतका की नकळत च उपास सुरू झाले , दिवसभर उपास करायचा ,संध्याकाळी उपासाचे पदार्थ☺ह्यात चैन !
आईचा उपसाचा स्टॅमिना जबरदस्त होता , ती फक्त शहाळ्याचे पाणी!
लग्नानंतर काही वर्षे आई कडे जाऊन पूजा केली, मग परदेशी जाणे झाले ,घरातच देवाला नमस्कार ! मुले लहान,ऑफिस ची घाई ह्या सर्वात घड्याळाकडे बघत पूजा करणे मला मान्य नाही झाले , उपास करत असे पण पूजा मांडणे बंद झाले।
त्यात काही वेळेस विकत आणलेली पत्री म्हणजे निव्वळ कचरा ,फुले शिळी हे बघून पूजा करणे बंद केले हे चांगले च झाले असे वाटायचे!
आज बरेच वर्षांनी पूजा केली , दारात उमललेली फुले , बागेतील पत्री गोळा करताना खूप मस्त वाटले.
😊परत लहान झाल्यासारखे च। मग तशी च पूजा केली.
देवपूजेने काही होत नाही इतपत मनाला माहीत असताना देखील पूजा करताना जे प्रसन्न वाटते ,त्याची तुलना कशाची च होत नाही!



No comments:
Post a Comment