Friday, 7 September 2018

असा ही अनुभव

अनुभव
गेल्या आठवड्यात औरंगाबाद येथील घृष्णेश्वर मंदिरात जाण्याचा योग आला.
वेळ ११/ ११.३० ची असल्याने मंदिरात फारशी गर्दी नव्हती.
दर्शन घेऊन बाहेर पडलो तर एक छोटा मुलगा गंध लावून घ्या असा आग्रह करत होता.
आम्ही नाही ,नको रे असे म्हटले.तर म्हणाला ते पैसे मला शिकायला उपयोगी पडतील. अर्थात मन द्रवले, म्हटले हम्म बघते!लगेच म्हणाला हवे तर पेन व वह्या घेऊन द्या ,हो म्हणून चपला-बूट घालण्याकरिता आम्ही दोघे तिथे गेलो. तर तिथे बसणाऱ्या आजी म्हणाल्या , ओ हा मुलगा शिकत नाही.उगाच इथे तिथे भटकतो.
त्या मुलाला विचारले, काय रे कितवीला आहेस?तर म्हणाला आहे मी पाचवी ला !
सांग बरे ,मराठीत पहिला धडा कोणता शिकवला ?
अ अ ....
बरे ,मग तू आता कोणता धडा वाचलास ?
काही उत्तर नाही.
का रे अभ्यास नाही करत का ?
तर गेला पळून !
म्हणजे आपल्या भावनेचा कसा उपयोग करून घेत असतात!
आपल्याला वाटते,खरं  देवावर पैसे खर्चण्यापेक्षा कोणाच्या शिक्षणा ला उपयोग होईल!


अर्चना कुलकर्णी
12 जानेवारी 2018


No comments:

Post a Comment