Wednesday, 12 July 2017

हुरहूर

हुरहूर

का वाटते मनाला हुरहूर ? कधी वाटते , कधी अचानक शांत होते आपले मन !
थांगपत्ता आपल्या मनाचा आपल्याला च नसतो तर इतरांना कसा लागणार ?
क्षणात इथून तिथे धावणारे मन , असते कसे ते दिसत का नाही ?
मनातली अस्वस्थता फक्त आपल्याला च जाणवते की इतरांना जाणवते ?
जर ती आपण न बोलता दुसऱ्याला जाणवली तर ती दुसरी व्यक्ती आपली होऊन जाते, कशाने तर मनाने !

आहे की नाही गम्मत , जे दिसत च नाही पण आहे निश्चित त्या गोष्टीने आपण दुसऱ्याला बांधतो।
बरं , हे बांधलेले दिसते का तर ते ही नाही।

पण ही बांधलेली व्यक्ती जेव्हा अस्वस्थ होते तेव्हा आपल्या मनालाच प्रथम ते जाणवते।
Everything confusing !


अर्चना
30।4।2017

No comments:

Post a Comment