चित्रकाव्य..
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
होतोय साजरा जल्लोषात
पाण्यासाठी होते वणवण
असे का बरे चित्र खेड्यात?
पावसाची कमी असते का
कीं नियोजनात करतो कसूर?
संसाराचा भार सांभाळत
डोईवर सांभाळते घागर!
जाता आणाया पाणी
घेतले सोबत लेकरू
देई त्याला शिकवणी
नको श्रमाला विसरू!
अर्चना कुलकर्णी.
No comments:
Post a Comment